राजर्षी छत्रपती शाहू महाराज (१८७४-१९२२)
जन्म : २६ जून १८७४ (कागलच्या घाटगे घराण्यात)
जन्मस्थळ : लक्ष्मीविलास पॅलेस, कसबा बावडा (कागलवाडी), कोल्हापूर. (संदर्भ : दै. सकाळ, २० एप्रिल २०११),
मूळ नाव : यशवंतराव • पित्याचे नाव : जयसिंगराव ऊर्फ आबासाहेब घाटगे ..
•आईचे नाव : श्रीमंत राधाबाईसाहेब
दत्तक विधान : १७ मार्च १८८४ (कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या पत्नी श्रीमंत आनंदीबाईसाहेब
यांनी कागलच्या घाटगे घराण्यातील यशवंतराव यांस दत्तक घेऊन त्यांचे नाव शाहू महाराज असे ठेवले.)
शिक्षण : १८८५ ते १८८९ : या काळात राजकोट येथील राजपुत्रांसाठीच्या महाविद्यालयात शिक्षण.
प्रिन्सिपल मॅकनॉटन यांच्या मार्गदर्शनाखाली राजांनी राजकोट येथील शिक्षण पूर्ण केले.
मार्च १८८६ : राजांना पितृवियोग सहन करावा लागला. (जन्मदात्रींचे निधन राजांच्या बालपणीच झाले होते.)
१८९० ते १८९४ : महाराजांनी धारवाड येथे सर एस. एम. फ्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी भाषा, राज्य
कारभार व जागतिक इतिहास आदी विषयांचे परिपूर्ण अध्ययन केले.
विवाह : १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याचे गुणाजीपंत खानविलकर यांची कन्या श्रीमंत लक्ष्मीबाई साहेब
यांच्याशी शाहू महाराजांचा विवाह.
राज्याभिषेक : २ एप्रिल १८९४ रोजी वयाच्या २० व्या वर्षी राजे कोल्हापूर संस्थानाचे कायदेशीर वारसदार बनले.
राजर्षी शाहू महाराजांचा राज्याभिषेक समारंभ मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न.
राजर्षी शाहू महाराजांनी केलेले विविध कायदे :
१८९४ : पासूनच वेठबिगाराची पद्धती बंद करून राजांनी अब्राह्मणांना संस्थानात नोकऱ्या देण्यास सुरुवात केली.
१९०१: राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात गोवध बंदी कायदा केला.
राजर्षि शाहू महाराजांनी केलेल्या शैक्षणिक सुधारणा :
संस्थानातील शैक्षणिक क्षेत्रावर महाराज दरवर्षी सुमारे एक लाख रुपये खर्च करीत असत.
११ जानेवारी १९११ : कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन केली.
१९११ : संस्थानात १५ टक्के विद्यार्थ्यांना नादारीची घोषणा.
१९१३ : कोल्हापुरात सत्यशोधक समाज शाळा सुरू.
२५ जुलै १९१७ : च्या वटहुकूमाने संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात आले.
सक्तीच्या शिक्षणाची पहिली शाळा संस्थानात चिपरीपेटा येथे सुरू
केली.
१९१८ ला राजाराम कॉलेज (कोल्हापूर) आर्य समाजाकडे हस्तांतरीत केले.
लष्करी शिक्षणासाठी संस्थानात इन्फंट्री स्कूलची स्थापना केली.
१९१२ : पाटील शाळांची स्थापना. १९१८ : संस्थानात तलाठी शाळांची स्थापना.
२५ जून १९१८ : संस्थानातील पारंपरिक कुळकर्णी वतने बंद करून त्या जागी पगारी तलाठ्यांची नेमणूक.
तलाठी शाळांची स्थापना. २९ जुलै १९१८ : तलाठी हे पद कायमस्वरूपी केले.
• पुरोहितांची शाळा काढून विविध जाती-जमातीतील नवे पुरोहित निर्माण केले.
मिस लिटल यांच्या राजीनाम्यानंतर संस्थानाच्या शिक्षणाधिकारीपदी राजांनी श्रीमती रखमाबाई केळवकर यांची नेमणूक केली.
महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्याचा महाराजांवर प्रभाव होता.
0 Comments