ग्रामपंचायत
ग्रामपंचायत हा पंचायत राजचा ग्रामपातळीवरील, अथवा निम्न स्तरावरील वा तिसऱ्या पातळीवरील कार्यरत घटक आहे.
ग्रामपंचायत हा पंचायत राज संस्थांचा पाया आहे. ग्रामपंचायत ही ग्रामसभेची कार्यकारी समिती आहे.
स्थापना : मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ मधील कलम (५) नुसार आणि, भारतीय राज्यघटनेतील कलम (४०) नुसार.
• मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ राज्यात १ जून १९५९ पासून लागू झाला.
ग्रामपंचायतीची रचना : ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी संबंधित खेड्याची लोकसंख्या किमान ६०० असावी लागते.
६०० पेक्षा कमी लोकसंख्या असल्यास दोन-तीन खेड्यांची मिळून 'ग्रुप ग्रामपंचायत' बनते.
• डोंगरी भागात ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी गावची लोकसंख्या किमान ३०० असावी लागते.
• सदस्यसंख्या : कमीत कमी (किमान) ७ व कमाल १७
गावच्या लोकसंख्येनुसार ग्रामपंचायत सदस्यांची संख्या पुढीलप्रमाणे -
गावाची लोकसंख्या सदस्य संख्या
६०० ते १५०० ७
१५०१ ते ३००० ९
३००१ ते ४५०० ११
४५०१ ते ६००० १३
६००१ ते ७५०० १५
७५०१ हून अधिक १७
डोंगरी भागात ३०० ते १५०० लोकसंख्येसाठी : ७ सदस्य
ग्रामपंचायत सदस्यांना पंच असे संबोधतात. • पंचांची निवड ग्रामसभेमार्फत प्रत्यक्ष निवडणुकीने होते.
आरक्षण : ग्रामपंचायतीमध्ये खालील जागा राखीव ठेवल्या जातात.
• महिलांसाठी : एकूण सदस्यसंख्येच्या ५०% जागा राखीव.
अनुसूचित जाती-जमातींसाठी : संबंधित खेड्यातील एकूण लोकसंख्येशी असलेले अनुसूचित जाती-जमातींचे
प्रमाण लक्षात घेऊन त्यांच्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून काही जागा राखीव ठेवल्या जातात.
• नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी : एकूण सदस्य संख्येच्या २७% जागा राखीव.
• ग्रामपंचायतीचे वॉर्ड तहसिलदार घोषित करतात.
• महत्त्वाचे : महिलांसाठी ५०% जागा राखीव असल्याने अनुसूचित जाती-जमाती व मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागांमध्येदेखील संबंधित प्रवर्गातील महिलांसाठी ५०% जागा राखीव ठेवल्या जातात.
ग्रामपंचायतीचा कार्यकाल : सर्वसाधारण स्थितीत ५ वर्षे (ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेपासून गणना)
राज्य शासन अपवादात्मक परिस्थितीत हा कार्यकाल एक किंवा सर्व ग्रामपंचायतींबाबतीत कमी-अधिक करू शकते.
• वाढीव कालावधी लक्षात घेता हा कार्यकाल साडेपाच वर्षांपेक्षा अधिक असू शकत नाही.
राम व्यवस्थापन (पंचायत राज) निवडणूक पद्धती : प्रत्यक्ष, प्रौढ व गुप्त मतदान पद्धती.
१८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीस मतदार गणले जाते, व त्यास मतदानाचा अधिकार प्राप्त होतो.
• उमेदवारी : ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवाराने वयाची २१ वर्षे पूर्ण केलेली असावीत.
महत्त्वाचे : दोनपेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्या उमेदवारांना आता ग्रामपंचायत (स्थानिक स्वराज्य संस्था)
निवडणूक लढविता येत नाही.
• पदाधिकारी : सरपंच, उपसरपंच. • ग्रामपंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्यांना पंच असे म्हणतात.
पूर्वी पंच आपल्यापैकी एका सदस्याची सरपंच म्हणून व दुसऱ्याची उपसरपंच म्हणून निवड करत असत.
३ जुलै २०१७ च्या निर्णयानुसार सरपंचांची निवड आता प्रत्यक्षरित्या थेट जनतेतून केली जाते.
• म्हणजेच सरपंचांची निवड प्रत्यक्षरित्या जनतेतून, तर उपसरपंचांची निवड अप्रत्यक्षरित्या पंचांकडून होते.
0 Comments